पोलीस प्रवाह न्युज
रायगड जिल्हा प्रतिनिधी – वैभव द सत्वे
कडाक्याच्या उकाड्यापासून काही दिवसांतच मोठा दिलासा मिळणार असून, मान्सून वाऱ्यांचं आगमन अंदमानात दाखल झालेल्या या वाऱ्यांची सकारात्मकरित्या प्रगती झाली असून, अरबी समुद्रापर्यंत मोसमी वाऱ्यांचे आगमन झाले असून त्यामुळं आता मान्सून खऱ्या अर्थानं केरळाच्या आणखी जवळ आल्याचं स्पष्ट आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मालदीव आणि श्रीलंकेपर्यंत मान्सून पोहोचला असून, तिथं अंदमान आणि बंगालच्या उपसागरात चांगला जोर धरला आहे. त्यामुळे २७ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होऊन स्थिरावणार आहे. यंदाच्या वर्षी अपेक्षित १३ मे पूर्वीच मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्ये दाखल झाले असून, तिथून या वाऱ्यांनी बंगलच्या उपसागरापासून अरबी समुद्र आणि श्रीलंकेच्या क्षेत्रसुद्धा व्यापलं आहे.

मान्सूनच्या प्रवासात वेग.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या तीन ते चार आठवड्यात मोसमी वारे पावसाचा प्रवास वेगानं होणार असून, येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणं अपेक्षित असून. वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झालेला आहे. मान्सूनच्या आगमनाचं एकंदरीत साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो केरळमध्ये धडकतो हळूहळू पुढे सरकत कोकणात दाखल होतो त्यानंतर मध्य महाराष्ट्र करत देशाच्या उर्वरित भागांना दाखल होतो. मात्र यंदा केरळतच मान्सून वेळेआधी आला, तर तो महाराष्ट्रातही वेळेआधीच म्हणजेच ६ जूनपूर्वीच येऊ शकतो. सर्वत्र उकाड्याने हैराण केले असून या दरम्यान, मान्सून दाखल होण्यापूर्वी देशातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा समावेश आहे. तर, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, आसाम आणि ओडिसा मध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून मान्सून पूर्व कामे देखील रेंगाळली आहेत. देशाच्या पूर्वोत्तर क्षेत्रापासून पश्चिम भारतापर्यंत चक्रीवादळी वाऱ्यांची निर्मिती होत असून या भागांमध्येसुद्धा वादळी पावसानं हजेरी लावली आहे. या वादळाच्या ठिकाणी पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक या भागांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.


































